दक्षिण भारतातील युवकांवर इसिसचा प्रभाव वाढतोय - एनआयए प्रमुख
लखनऊ, दि. २८ - इसिसला भारतात आपली पाळेमुळे रुजवता आली नसली तरी, इसिसच्या धोक्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. युवकांना इसिसच्या प्रभावापासून दूर ठेवण्याचे आव्हान आज समोर आहे. विशेष करुन दक्षिण भारताती-
उत्तरप्रदेश, बिहारपेक्षा दक्षिण भारतातील राज्यांमधील युवक कट्टरपंथीय विचारधारेच्या जाळयात अडकत आहे. इसिस इंटरनेट आणि सोशल मिडीयाचा वापर करुन युवकांना आपल्या जाळयात ओढत आहे. दिशा भरकटलेल्या या युवकांना पुन्हा योग्य वाटेवर आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरु केली आहे.भारतीय युवक कट्टरपंथीय विचारधारेकडे झुकण्याचे कारण सामाजिक आणि आर्थिक नसल्याचे शरद कुमार यांनी स्पष्ट केले.
-
- ल राज्यांमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक शरद कुमार यांनी सांगि
